काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत ९ जण ठार

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत ९ जण ठार
24-07-2008


श्रीनगर, २४ जुलै (वृत्तसंस्था) - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यांत ९ जण ठार झाले व २० जण जखमी झाले. शहरातील बाटमलू बसस्थानकावर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेडच्या स्फोटात ५ जण ठार झाले असून १८ जण जखमी झाले.
(दहशतवाद्यांचे नंदनवन बनलेल्या काश्मीरमधील दहशतवाद कायमस्वरूपी निपटून काढण्यासाठी आक्रमक पावले न उचलणारी आतापर्यंतची केंद्रातील व काश्मीरमधील सर्वपक्षीय सरकारे वैचारिक क्रांती अपरिहार्य करतात ! - संपादक) जखमींमध्ये ३ मुलांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनपर्यंत कुठल्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.दोडामध्ये चार जणांची हत्या दोडा जिल्ह्यात हिजबुल मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना सोडलेल्या गुलाम हसन वणी व त्याच्या कुटुंबातील तीन जणांची दहशतवाद्यांनी हत्या केली. आज सकाळी दहशतवादी वणी याच्या घरात घुसले व त्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारामध्ये वणी याच्यासह चार जण ठार झाले. ही हत्या हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केली. हत्या करून हे दहशतवादी पसार झाले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २ सुरक्षा जवान जखमी आज दहशतवाद्यांनी शहरातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात २ जवान जखमी झाले. नूरबाह परिसरामध्ये असलेल्या या सुरक्षातळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा मारा केला.

काश्मीरची समस्या

१ जुलै १९४७ रोजी मंजूर झालेल्या इंडियन इंडिपेंडन्स अँक्ट या कायद्यानुसार भारत-पाक फाळणी झाली. २६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मिरी जनतेच्या संमतीनेच काश्मीरचे भारतात विलिनीकरण झाले.
तेव्हापासूनच पाकिस्तानने भारताला सशस्त्र संघर्षात खेचले. `आयएएस' ही पाकिस्तानची गुप्‍तहेर संघटना प्रशिक्षित दहशतवादी भारतात सोडणे, मुसलमानी राज्यांतील टोळयांना जिहाद करण्यास भारतात सोडणे अशा कारवाया करत आहे. जम्मू-काश्मीरच्या भूमीवर चार युद्धे होऊनही खरीखुरी शांतता अद्याप नाही; उलट पाकिस्तानने पुकारलेल्या छुप्या युद्धाचा रंग अधिक रक्‍तरंजित होत आहे व त्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटले आहेत. अद्याप तो जीवघेणा संघर्ष शमलेला नाही ! त्याचे स्वरूप आता आक्राळ-विक्राळ झाले आहे. गेली कित्येक वर्षे भारतीय सैन्य मात्र रात्रीचा दिवस करून देशाच्या सीमांचे रक्षण करत आहे ! मूळची कश्यप ऋषींची भूमी असलेल्या या काश्मीरमधील लाखो हिंदूंना मुसलमानांनी निर्वासित केले आहे ! त्यांची क्रूर आणि अमानूष हत्याकांडे घडवून, त्यांच्या स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करून काश्मीर हिंदुरहित करण्याचा त्यांचा डाव आहे ! तेथील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करून हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा चंग बांधला आहे ! निष्क्रीय व मुसलमानांनाचे लांगूलचालन करणारे राज्यकर्ते ना धड सैन्याला काही आदेश देत ना स्वत: काही कृती करत. येथील हिंदूंचे हालहाल होत असतांना राज्यकर्त्यांना मात्र काश्मीरची समस्या तशीच ठेवायची आहे ! हिंदूंनो, संघटित व्हा, अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यास सरकारला भाग पाडा !

काश्मीर = प्रचंड दहशत

काश्मीर = प्रचंड दहशत !
हिंदूंचा सर्वनाश करणार्‍या मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या राज्यकर्त्यांना धडा शिकवा !
06-07-2008

दहशतवाद्यांकडून चालू असलेली हिंदूंची हत्याकांडे, जुलूमजबरदस्ती, जाळपोळ, दंगे, बलात्कार इत्यादी प्रकारांचा परिणाम म्हणून आजवर कित्येक लाखांहून अधिक हिंदूंना आपल्या जिवाचे व धर्माचे रक्षण करण्यासाठी घरदार सोडून विस्थापित व्हावे लागले आहे.

















हिंदूंना तेथे दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. कधी खून, दंगली होतील, कधी संचारबंदी लागू होईल, याचा प्रंचड मानसिक ताण तेथील समाजावर असतो. हिंदूंची निघृण हत्याकांडे १९९९ पर्यंत हिंदूंची २४ मोठी हत्याकांडे झाली. येथील दफनभूमीच्या क्षेत्रात ७० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. १९८९ ते जून २००८ या कालावधीत एकूण ९३ हजार ३३६ हत्या करण्यात आल्या, तर अनाथ झालेल्या मुलांची संख्या १ लाख ७ हजार ८० इतकी आहे.












जालापोल व दंगली१९८९ ते जून २००८ या कालावधीत मालमत्तेला आग लावण्याच्या/उद्ध्वस्त करण्याच्या घटना १ लाख ५ हजार ६३१ होत्या.

















हिंदु महिलांवर अत्याचारहिंदु महिलांवर बलात्कार करणे, त्यांनी सैनिकांना पाणी दिले, तर त्यांचे मुंडण करणे, परदेशी दहशतवाद्यांना त्यांना भेट देणे, स्थानिक व्यक्‍तींना त्यांच्या पत्‍नीबरोबर घटस्फोट घ्यायला भाग पाडून त्यांना दहशतवाद्यांशी लग्न करायला भाग पाडणे व न केल्यास त्यांना विद्रुप करणे किंवा त्यांची हत्या करणे, महिलांना विकणे यांसारखे अनन्वित अत्याचार दहशतवादी करत आहेत. दहशतवाद्यांच्या भीतीने येथील महिलांची पाळी तिसाव्या वर्षी बंद होते. १९ जानेवारी १९८९ रोजी दहशतवाद्यांनी मशिदीवरून घोषणा दिल्या, `हिंदूंनो, तुमच्या स्त्रियांना येथे सोडून निघून जा !' १९८९ ते जून २००८ या कालावधीत बलात्कार व स्त्रियांच्या छेडछाडीच्या घटना ९ हजार ७७६ एवढ्या होत्या, तर विधवा झालेल्या महिलांची संख्या २२ हजार ६०६ आहे.













भारतीय सैन्याचे बळी व नुकसान१९८८ ते १९९९ या काळात सुरक्षादलावर १८ हजार ९२९ वेळा हल्ले झाले व दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत १ हजार ९०६ जवान शहीद झाले. डोक्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार, कायमची युद्धसदृश स्थिती, रजा न मिळणे, जवानांमध्ये मानसिक ताण, उदासिनता अशा मानसिक आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाणही वाढले आहे.








प्रचंड आर्थिक नुकसान१९९९ पर्यंत १२ वर्षांत दहशतवाद्यांनी २५ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले.







म्लेंच दुर्जन उदंड । बहुता दिसाचे माजले बंड । याकारणे अखंड । सावधान असावे ।।