अमरनाथ व `काश्मिरियत' यांचे वास्तव

अमरनाथ व `काश्मिरियत' यांचे वास्तव
लाहोर ते काश्मीर यांत विकसित होत असलेला मोगलमार्ग म्हणजे भारतद्वेषी आतंकवाद्यांसाठी प्रवेशद्वार !
03-08-2008

नमस्ते शारदेदेवी काश्मीरपुरवासीनी ।

त्वामहं प्रार्थये नित्यं विशादानंच दे ही मे ।।


आपल्या भारतीय संस्कृतीत विद्यास्वरूप सरस्वती देवीचे अधिष्ठान म्हणून एकजीव झालेल्या काश्मीर प्रदेशाला भारतापासून दूर करण्यासाठी `काश्मिरियत' ही भयंकर संकल्पना गेल्या दशकभर काश्मीरमध्येच नव्हे, तर भारतीय प्रसारमाध्यमे, विचारवंत व स्वयंसेवी संघटनांमध्ये पद्धतशीरपणे रुजवली जात आहे. त्याचाच परिपाक म्हणजे अमरनाथ क्षेत्राला जमिनीची जागा देण्यावरून उठलेले आंदोलन आहे !

लेखक : श्री. अभिजीत

जाणीव हरपलेली प्रसारमाध्यमे !

काश्मीर खोर्‍यात झालेल्या दंगली, त्या दंगली व जाहीर सभा यांमधील भारतविरोधी घोषणा, धर्मांध जमावाच्या तावडीत सापडून तुडवले गेलेले भारतीय सैनिक, जाळले गेलेले भारतीय ध्वज, अमरनाथ भाविकांवर झालेले हल्ले, या अराजकसदृश घटनांबाबत भारतीय प्रसारमाध्यमांकडून `काश्मीरमधील राजकीय गोंधळ' किंवा `जमिनीबाबत गैरसमजूत' असा आभास केला जात आहे. उजवे-डावे, सेक्युलर वा नॉनसेक्युलर, अशा सर्व मंडळींचा कल सांभाळत प्रसारमाध्यमांकडून लिहिल्या गेलेल्या अग्रलेखांत या घटनेचे महत्त्व, परिस्थितीचे विषयवार मूल्यमापन कुठेच दिसत नाही. प्रसारमाध्यमांकडून हा विषय बाजूला सारला जातांना, परदेशी पैशांवर पोसलेल्या स्वयंसेवी संघटना व त्यांच्या साहाय्याने `राज्य'विरोधातून (अँन्टी स्टेट) सुरू होणारा प्रवास दहशतवादाच्या दाराशी संपतो, ही त्यांची जाणीवच हरवून गेली आहे.
अमरनाथ प्रकरणातील दुर्लक्षण्यात आलेली महत्त्वाची बाब `काश्मिरियत' !
अमरनाथ देवस्थान संदर्भात झालेल्या गदारोळात राजकीय साठमारी व दंगली यांना जेवढी प्रसिद्धी मिळाली, तेवढेच खालील तीन मुद्दे दुर्लक्षण्यातही आले.
१. अमरनाथचे राष्ट्रीय
२. अमरनाथ यात्रेचे `व्यवस्थापन, मूलभूत सुविधा व सर्वात्मक विकास', यांची गरज
३. `काश्मिरियत' - काश्मीरचे पर्यावरण, सांस्कृतिक वारसा व लोकजीवन या गोंडस नावांखाली दडलेला भारतविरोध व वेगळेपणाची भावना !
अमरनाथ हे केवळ धार्मिक क्षेत्र नसून काश्मीरच्या भारतीयत्वाचा एक मजबूत दुवा आहे. दुर्दैवाने हे भारतीय विचारवंतांना न जाणवता देशविरोधी शक्‍तींना समजले आहे. अमरनाथला सरकारने जागा देण्यासंदर्भात अमरनाथ देवस्थान मंडळाचा उल्लेख करून, काश्मीरमधल्या देशविरोधी वृत्तपत्रांनी त्यावर खालील प्रकारे टीका केली आहे.
``The board wants to make every indian citizen astake holder in indians fight against kashmir'' (``काश्मीर मुक्‍ती संग्रामाच्या विरोधातील भारतियांच्या लढाईत प्रत्येक भारतीय नागरिकाचा सहभाग असायला हवा, असे अमरनाथ देवस्थान मंडळाचे म्हणणे आहे.'')
त्यामुळे अमरनाथ यात्रेमध्ये जेवढ्या अडचणी रचता येतील किंवा यात्रेला सुविधा कशा नाकारता येतील, हे निवडून आलेल्या व `काश्मिरियत'वर श्रद्धा बाळगणार्‍या काश्मीर सरकारने बघितले.
मूलभूत सुविधांचा अभाव असलेली अमरनाथ यात्रा आणि त्याला मिळालेल्या `वादग्रस्त' जमिनीचा प्रवास !
अमरनाथ यात्रींच्या सुदैवाने ले. जनरल सिन्हा हे निवृत्त तडफदार भारतीय सेनादल अधिकारी काही काळ काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांनी यात्रा बंद करायचे सर्व प्रयत्‍न सरकारला झुगारून बंद पाडले. अमरनाथला असणारे प्रतिकूल हवामान, कठीण वाट चढतांना होणारे श्रम व यात्रेत असलेला महिलांचा सहभाग लक्षात घेता या यात्रेला आवश्यक मूलभूत सुविधा २००४ पर्यंत नाकारण्यात आल्या. यात्रेकरूंसाठी स्वच्छतागृह बांधण्याससुद्धा परवाना नाकारण्यात आला; कारण देण्यात आले की, जमीन सरकारच्या मालकीची आहे. शेवटी राज्यपालांच्या प्रयत्‍नांना यश येऊन स्वच्छतागृह बांधायला परवानगी मिळाली व ते बांधण्यात आले. २००५ साली यात्रेचा कालावधी वाढवण्यास सरकारने नकार दिला. शेवटी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा आदेश आल्यावर परवानगी मिळाली. हिंदूंच्या या देवस्थानाकडे स्वत:ची जागा नसल्याने, एखाद्या सेवाभावी संस्थेला यात्रेकरूंना मोफत अन्न-चहा (लंगर) द्यायचे असल्यास परवाना मिळण्यासाठी बरीच यातायात करावी लागते. परवाना मिळाला, तर लंगर कुठे लावायचा, हेही सांगितले जात नाही. भारत सरकारकडून मोठा अन्नसाठा उचलला जातो; पण तो यात्रेकरूंना न देता अन्यत्र वळवला जातो. सरकारी मदत बाजूलाच ठेवा; पण स्वत:च्या पैशांनीही जागा घ्यायला अन्य भारतियांना परवानगी नाही. त्यामुळे गेली काही वर्षे सरकारकडे अगतिकपणे अन्य जागेची मागणी होत होती. शेवटी बर्‍याच प्रयत्‍नांती २६ मे २००८ ला सरकारी आदेश क्र. १८४ अन्वये एकोणचाळीस हेक्टर जमीन देवस्थानकडे देण्याची प्रक्रिया सुरू झाली; पण याला दहशतवादी संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अन्य स्थानिक मुस्लीम पक्ष यांबरोबर काही मूठभर पर्यावरणीय संस्थांनी ही जागा संस्थानास दिल्यास व त्यावर सुविधा उभारल्यास काश्मीरचा वारसा संपणार, असा सूर लावला. सदर जमीन जरी वनखात्याची असली, तरी त्यावर एकही झाड नाही. एप्रिल २००५ साली जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने सरकारचा आदेश दिला होता की, देवस्थानाला सरकारने जागा वापरू द्यावी. न्यायालयाच्या आदेशाचा अंदाज आल्याने २८ मार्च २००५ ला वनमंत्र्यांनी जागा देण्याच्या मागणीला अनुमोदन दिले. मग राज्याचे मुख्य सचिव ते वन सल्लागार समिती, असा तब्बल तीन वर्षांचा प्रवास करून देवस्थानला जागा मंजूर झाली.
तथाकथित पर्यावरणवाद्यांचा कावेबाजपणा आणि काश्मिरी मुसलमानांचा दुर्योधनी पवित्रा !
मी स्वत: पर्यावरण संस्थेमध्ये काम केले असून गोवा-महाराष्ट्रातील मंदिरक्षेत्रांशी स्थापत्य सल्लागार म्हणून कार्यरत आहे. पायाभूत सुविधा विकास योजना व स्थानिक पर्यावरण यांतील संबंधांचा अभ्यास असल्याने अमरनाथ यात्रेमुळे पर्यावरण खराब होईल, या तथाकथित पर्यावरणवाद्यांच्या दाव्यातील कावेबाजपणा मी आपल्यापुढे मांडत आहे. सर्वसाधारणपणे इतके लोक तिथे जाणार म्हणजे पर्यावरण खराब होणारच, हे गृहितक बरोबर नाही. मी स्वत: महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री शनी-शिंगणापूरला ५० हजार भाविक प्रतीदिन आल्यास लागणार्‍या रचनेचा आराखडा दिला आहे. हिमालयातील अमरनाथ जरी समुद्रसपाटीच्या उंचावरील प्रदेश असला, तरी तेथील तज्ञांनी त्याची योग्य पद्धतीने मांडणी केल्यास हे सहज शक्य आहे. हिमालयातील अमरनाथ व बद्रीनाथ या परिसरांचा `निसर्ग एकात्म' पद्धतीने कसा विकास करता येईल, याचा अभ्यास मी तेथे राहून केलेला आहे. त्यामुळे समुद्रसपाटीपासून उंचावरील प्रदेशामध्ये ४ लाख लोक गेले, तर त्यामुळे पर्यावरणावर परिणाम होईल, हा दावा नकारात्मक विचारसरणीचे द्योतक वाटते. खुद्द हिमालयाच्या कुशीतील उंचावरील प्रदेशात यशस्वी झालेली योजना म्हणजे `नंदादेवी क्षेत्र'मधील शिखांच्या हेमकुंड तीर्थक्षेत्राच्या मार्गावर राबवलेली `इको डेव्हलपमेंट' ! ही योजना राबवल्यानंतर अवघ्या ३ वर्षांत मी पुन्हा त्या ठिकाणी गेलो होतो. मला त्या परिसराच्या व्यवस्थापनात खूप फरक दिसला. माझ्या पहिल्या खेपेपेक्षा दुसर्‍या खेपेच्या वेळी तेथे भाविकांची संख्या चौपट झाली होती; पण परिसर पहिल्या खेपेपेक्षा खूपच नीटनेटका व संरक्षित होता. अशा यशस्वी योजनांतून शिकून जर अमरनाथ परिसरात योजना केल्यास त्यात निश्चितच यश मिळेल. हे सर्व पहाता यात्रांचे आयोजन व सुविधा, इमारतींची रचना-मांडणी वगैरे निसर्गावर बाधा न आणता करता येते; पण दुर्दैवाने अमरनाथ मार्गावर या योजना अवलंबणार, तर काश्मिरी मुसलमान अगदी तीळभरसुद्धा जागा हिंदूंना मिळू नयेत, असा दुर्योधनी पवित्रा घेऊन आहेत.
यात्रांचे व्यवस्थापन आणि अमरनाथ यात्रेकरूंचे दुर्दैव !
सर्वसाधारणपणे अशा यात्रांमध्ये सुसुत्रीकरण व विकास असे दोन भाग असतात.
१. यात्रेकरूंच्या प्रवासाचे व्यवस्थापन (Devotee flow managment)
२. सुविधांची रचनात्मक मांडणी
पहिला भाग बर्‍याच अंशी व्यवस्थापन कौशल्याचा असतो. त्यात सतर्क नियंत्रण (continuous monitoring)) आवश्यक असते.
सुविधांची मांडणी ही स्थापत्य/ रचनात्मक कौशल्याची असते. सुविधाची रचना अशा दीर्घपल्ल्यांच्या यात्रांसाठी मिश्र पद्धतीने म्हणजे केंद्रीभूत पूर्ण सुविधा (continuous monitoring)) व विकेंद्रीत मूलभूत सुविधा असे करणे योग्य ठरते. अर्थात या विकेंद्रीत सुविधांमध्ये करावी लागतात. अमरनाथ देवस्थानाला जी जागा देऊ केली होती, त्यावर मंडळ केंद्रीभूत पूर्ण सुविधा (centralised facilities)) म्हणजे यात्रेकरूंना रहाण्याची सोय, सामानघर, दळणवळणाची साधने, जेवणघर, स्नानघर व स्वच्छतागृहे इत्यादी करू शकले असते. खरेतर उरलेल्या सोयी करण्यासाठी देवस्थानकडे स्वायत्तता व संपूर्ण मार्ग सोपवणे आवश्यक होते; पण आता दुर्दैवाने संपूर्ण यात्रा एका मुसलमान व्यक्‍तीच्या हातात आल्याने, भाविकांना कठीण जाणार आहे.
`काश्मिरियत'ची असलीयत अर्थात वास्तव !
खरेतर हे सर्व होण्याचे कारण म्हणजे दहशतवादी, मुस्लीम पक्ष व मूठभर स्वयंसेवी संघटना / व्यक्‍ती यांच्या दबावाखाली सरकार झुकले. ज्या वेळी २००५ साली लाहोर ते काश्मीर हा मोगलांनी वापरलेला जुनामार्ग `मोगलमार्ग' म्हणून विकसित करायचे ठरवले, तेव्हा तो चार प्रमुख अभयारण्यांतून जातो व १० हजारांहून जास्त झाडे कापली जातात; यावर कुठल्याच पर्यावरणप्रेमीने आवाज उठवलेला नाही. जम्मू-काश्मीर सरकार ५ हजार गुंठे वनजमीन बाबा घुलामशाह बादशाह विद्यापिठाला देऊ शकते; पण त्याहीपेक्षा लहान जमिनीतील शारदापीठ विद्यापीठ मात्र रद्द करते, ही `काश्मिरियत'ची असलीयत अर्थात वास्तव आहे.एका बाजूला काश्मीर खोरे पेटवले जाते, ध्वज जाळले जातात. यात्रेकरूंवर हल्ले होतात. अमरनाथ समर्थकांवर ग्रेनेड फेकले जातात व त्याच वेळी स्वयंसेवी संघटना `पर्यावरण' व पारंपरिक वारशाचा बागुलबुवा करून मूळ वारशावरच घाला घालू पाहतात. अमरनाथ ते थेट सबरीमलापर्यंत काश्मीरमध्ये सुरू झालेली स्वयंसेवी संघटना व देशविघातक शक्‍तींचे ही वीण आता देशभर पसरली आहे !

काश्मीरमधील धर्मांधतेचे राजकीय भूत

काश्मीरमधील धर्मांधतेचे राजकीय भूत !
अमरनाथ देवस्थानाला जागा देण्यास विरोध करणार्‍या मुसलमानांना अन्य राज्यांत मशिदींसाठी जागा मागण्याचा काय अधिकार !
01-07-2008

अमरनाथ देवस्थान मंडळाला ४० हेक्टर वनजमीन दिल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे सरकार अडचणीत आहे. देवस्थान मंडळाला वनजमीन हस्तांतरित केल्यानंतर सरकारमधील घटकपक्ष असलेल्या पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाने (पीडीपी) डोक्यात राख घालून घेतली व सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय तडकाफडकी जाहीर केला.

अमरनाथ देवस्थानाला सरकारी जमीन देण्यास पीडीपीने प्रथमपासून विरोध दर्शवला होता. आता या मुद्यावर विचार करण्यासाठी काँग्रेसने काही दिवसांची मुदत मागून घेतली होती; पण या मुदतीपर्यंत थांबण्याइतका धीर पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती महंमद सईद यांच्याकडे नव्हता. त्यामुळे त्यांनी सरकार अल्पमतात आणण्यात तत्परता दाखवली. अमरनाथ देवस्थान मंडळाला जमीन देण्यात पीडीपीचा विरोध असण्याचे मुख्य कारण या पक्षाच्या धर्मांधतेत आहे.
पीडीपीला काश्मीरमध्ये हिंदुत्वाच्या खुणा नकोत ! पीडीपी हा संपूर्ण पक्षच कट्टर इस्लामी आहे. भारतीय लोकशाहीऐवजी `इस्लामभूमी'वर या पक्षाचा अधिक विश्‍वास होता. या पक्षाची भूमिका नेहमीच हिंदूंच्या विरोधात होती. तसेच पीडीपी हा पक्ष काश्मीरमधील मुसलमानांचे धार्मिक प्रतिनिधीत्व करणारा पक्ष म्हणून अधिक ओळखला जातो.
काश्मीरमधील मुसलमान अमरनाथ देवस्थान मंडळाला सरकारने वनजमीन दिल्यामुळे लालेलाल झाले होते. सलग ६ दिवस त्यांची हिंसक आंदोलने सुरू होती. त्यात तिघांचा मृत्यू झाला. मुसलमानांच्या सरकारविरोधी भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत, याचे हे लक्षण आहे. धर्मांधतेचे राजकारण करणार्‍या पीडीपीला अशा अवस्थेत सत्तेत राहणे सोईचे नव्हते. त्यामुळे अमरनाथ `देवस्थान मंडळाला सरकारी जमीन नको' ही मुसलमानांची मागणी पीडीपीने उचलून धरण्यात सामाजिक हिताच्या ऐवजी राजकीय हिताचाच विचार अधिक आहे, असे म्हणता येईल.
तसे पहायला गेले, तर काश्मीर ही कश्यप ऋषींची म्हणजे हिंदूंची भूमी आहे. या देवभूमीतील हिंदूंच्या एका पवित्र तीर्थस्थळाला जमीन दिली म्हणून खैबरखिंडीतून आलेल्या परक्या मुसलमानांनी इतकी खदखद करण्याचे कारणच नव्हते; पण हपापाचा माल गपापा करणार्‍या मुसलमानांना सहिष्णुतेचा गंधही नाही. भारतातील हिंदुबहुल राज्यांत मशिदी व मदरसे बांधण्यासाठी शेकडो एकर जमिनी हव्यात; पण मुसलमानबहुल काश्मीरमध्ये हिंदूंच्या देवस्थानासाठी सरकारने अवघी ४० हेक्टर म्हणजे १०० एकर जमीनही देऊ नये, हा आडमुठेपणा केवळ मुसलमानच दाखवू शकतात. अशा दुष्टांना निधर्मी राज्यकर्ते `बांधव' संबोधतात, हेच दुर्दैव ! काश्मीरमधून हिंदूंची संख्या कमी होईल, यासाठीच तेथील मुसलमानांचे वर्षानुवर्षांपासून प्रयत्‍न सुरू आहेत व राज्यकर्त्यांची त्यांना साथ आहे. अमरनाथ देवस्थानाच्या दर्शनासाठी जगभरातील हिंदूंचा लोंढा काश्मीरमध्ये घुसणे तेथील मुसलमानांना रुचत नाही. सरकारी जमिनीवर या देवस्थानाचा विकास झाला, तर येथे येणार्‍या भाविकांची संख्या वाढेल व हिंदु धार्मिकताही जोर धरेल, असे त्यांना वाटते. मुसलमानांच्या शेकडो वर्षांच्या प्रयत्‍नानंतर काश्मीरमधील हिंदुत्व नष्ट होण्याच्या मार्गावर असतांना अमरनाथ देवस्थान मंडळाला जमीन देणे हिंदुत्वाला खतपाणी घालण्यासारखे आहे आणि याचीच धास्ती मुसलमान व पीडीपी या दोघांनीही घेतली आहे.
काँग्रेससमोर इस्लामी धर्मांधतेचे आव्हान !
काश्मीरमधून परागंदा झालेल्या हिंदूंचे पुनर्वसन करण्याच्या दिशेने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अलीकडेच सुतोवाच केले होत; मात्र अमरनाथ देवस्थान मंडळाला सरकारी जमीन देण्याच्या मुद्यात मुसलमानांचे असहिष्णू धोरण पाहिले, तर काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन करणे किती अवघड आहे, याची प्रचीती पंतप्रधानांना येईल. विशेष म्हणजे हिंदूंच्या कट्टर विरोधात असलेला पीडीपीसारखा पक्षही सत्तेत आहे. अशा स्थितीत सुरक्षेची हमी न देता काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे म्हणजे त्यांच्या मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे. तरीही पंतप्रधान व त्यांची काँग्रेस काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन करण्याचे वक्‍तव्य करते, यामागे स्वत:ची धर्मनिरपेक्ष प्रतिमा चकचकीत करण्याचे नाटक आहे. आता देवस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री. एन्.एन्. व्होरा यांनी काश्मीरच्या सरकारने अमरनाथ देवस्थानला दिलेली जमीन सरकारला परत केली आहे. अमरनाथ मंदिराला वनजमीन दिल्याच्या मुद्यावरून काश्मीर राज्यभर उसळलेल्या दंगली आणि हिंसाचार आता थांबले. काश्मीरमधील या दंगलीमध्ये तीन जण मरण पावले आणि दंगलीचे हेच वातावरण सुरू राहिले असते, तर किती तरी जण मृत्यूमुखी पडले असते. श्री. व्होरा यांची सहिष्णुता या प्रकरणातील हिंदुविरोधी आग विझवू शकली. हिंदूंच्या विरोधात जाणार्‍या अशा गोष्टी म्हणजे हिंदूंच्या सहनशीलतेची परीक्षाच होय !

धर्मांतर करणार्‍या दलितांनो

धर्मांतर करणार्‍या दलितांनो, डॉ. आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे इस्लाम वा ख्रिस्ती धर्म स्वीकारून राष्ट्राचा घात करणार नाही, याची काळजी घ्या व हिंदु संस्कृतीचे पाईक बना !
08-07-2008

जर माझ्या अस्पृश्य बांधवांनी इस्लाम वा ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तर ते हिंदु संस्कृतीबाहेर फेकले जातील, अराष्ट्रीय बनतील. त्यामुळे भारताच्या सुरक्षिततेला मोठा धोका पोहोचेल. हिंदु संस्कृतीचा नाश होईल, असे आपण काही करणार नाही.' - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

धरणाच्या पाण्यात प्रसिद्ध हिंगलाज देवीचे मंदिर जाण्याची भीती

धरणाच्या पाण्यात प्रसिद्ध हिंगलाज देवीचे मंदिर जाण्याची भीती !
08-07-2008

क्वेट्टा(पाकिस्तान), ७ जुलै (वृत्तसंस्था ) - येथील हंगोल नदीवर धरण बांधण्याचा घाट सरकारने घातला आहे. या धरणाच्या निर्मितीमुळे ऐतिहासिक हिंगलाज देवीचे मंदिर पाण्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
या धरणाला पर्यावरणवादीदेखील विरोध करत आहेत. बलुचिस्तान प्रांताचे वीज व पाणीपुरवठा मंत्री सरदार मुहमंद अस्लम बिझेंजो यांनी अनेक प्रांतिक मंत्र्यांसमवेत प्रस्तावित धरणाच्या बांधकामाला विरोध केला असून हे धरण बांधल्यास मंदिर व त्याकडे जाणारे रस्ते पाण्याखाली जातील. देशातून परदेशात मोठ्या प्रमाणावर हिंदू येथे येतात. येथे जत्रादेखील पार पडते. आपण हे मंदिर पाण्याखाली जाऊ दिल्यास पाकिस्तानच्या जागतिक प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होईल, असे त्यांनी पारित केलेल्या ठरावात म्हटले आहे. हिंदुबहुल भारतातील मंदिरे संकटात असतांना त्याविषयी काहीही न करणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते पाकिस्तानमधील मंदिरे संकटात असतांना काही करणार नाहीत, याची खात्री बाळगा !

भ्रष्टाचारी देशांच्या क्रमवारीत भारत ७४ व्या स्थानावर

भ्रष्टाचारी देशांच्या क्रमवारीत भारत ७४ व्या स्थानावर
26-06-2008

न्यूयॉर्क, २६ जून (प्रे.ट्र.) - `ट्रान्स्फरन्सी इंटरनॅशनल' या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्थेने तयार केलेल्या भ्रष्टाचारी देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत ७४ व्या स्थानावर घसरला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत भारत दोन अंकांनी खाली गेला आहे. (याला जबाबदार कोण आहे, याचे उत्तर जनतेला माहीत आहे. देशाला अधोगतीच्या खाईत लोटणार्‍यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी आता क्रांतीला पर्याय नाही ! - संपादक)पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून भ्रष्टाचारी देशांच्या क्रमवारीत तो देश सध्या १४० व्या स्थानावर आहे, तर रशिया १४५ व्या स्थानावर आहे. २००७ मध्ये भारत व चीन ७२व्या क्रमांकावर होते; मात्र या वर्षी भारत दोन अंकांनी खाली घसरल्याने चीनपेक्षा जास्त भ्रष्टाचारी ठरला आहे. डेन्मार्क, फिनलँड, न्यूझिलंड, सिंगापूर व स्वीडन हे देश क्रमवारीत पहिल्या पाच क्रमांकावर असून ते जगातील सर्वांत कमी भ्रष्टाचारी देश ठरले आहेत.

काश्मीरमध्ये मुसलमानांनी केलेल्या हिंसाचारात ४५ जण जखमी

काश्मीरमध्ये मुसलमानांनी केलेल्या हिंसाचारात ४५ जण जखमी
26-06-2008

अमरनाथ देवस्थानाला सरकारने जमीन दिल्याचे प्रकरण

कुठे हिंदूंच्या मंदिरांना ४० एकर जमीनही न देणारे काश्मीरमधील मुसलमानांचे सरकार, तर कुठे लाखो एकर जमिनी मदरसे, हज हाऊस, मशिदी, दर्गे इत्यादींना देणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते !

श्रीनगर, २६ जून (प्रे.ट्र.) - श्री अमरनाथ देवस्थानाला सरकारने जमीन हस्तांतर केल्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी काश्मीरमधील मुसलमानांनी आज सलग चौथ्या दिवशी तीव्र निदर्शने केली. (हिंदूंनो, गेली हजारो वर्षे मंदिरे नष्ट करून त्याजागी मशिदी बांधणार्‍या मुसलमानांना हिंदुद्वेष जाणा ! - संपादक) या जमिनीवरील बांधकाम थांबवण्याचे आदेश काल काँग्रेसचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी दिले होते.
आज विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारामध्ये ४५ जण जखमी झाले. यामध्ये १२ सुरक्षाजवानांचा समावेश आहे. काश्मीरमध्ये सुरू असलेल्या या हिंसक आंदोलनांचा हा चौथा दिवस असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज अनंतनाग, खन्नाबल, बंदीपाडा व गंधेरबल या जिल्ह्यांमध्ये हिंसक जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. अनंतनाग जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हिंसक जमावाने रोखल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रयत्‍न करत आहेत. अनंतनाग जिल्ह्यामध्ये पंजाब राष्ट्रीय बँकेसमोर पोलीस तैनात करण्यात आले होते. आज हिंसक जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. सौरा शहरामध्ये जमावावर नियंत्रण मिळवण्यासठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करत जमावावर लाठीहल्ला केला.

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांची राज्यपालांशी भेट आज ओमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल श्री. एन्.एन्. चोप्रा यांची भेट घेतली. ''सरकारने श्री अमरनाथ देवस्थान मंडळाला दिलेली ४० एकर जमीन परत घ्यावी'', अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. ''सरकारने श्री अमरनाथ देवस्थानाला दिलेली जमीन परत घेणे, हाच या समस्येवरील तोडगा आहे. सरकारने असे केले, तर लोकांच्या भावना शांत होतील'' (हिंदूंनो, या हिंदुद्वेष्ट्यांना लक्षात ठेवा. - संपादक)

सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची पीडीपीची धमकी सरकारने श्री अमरनाथ देवस्थानाला दिलेली जमीन पुन्हा ताब्यात घेऊन सदर निर्णय रद्द केला नाही, तर सरकारचा पाठिंबा काढून घेण्यात येईल, अशी धमकी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीने दिली आहे. ``यासाठी सरकारला ३० जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे'', अशी माहिती उपमुख्यमंत्री व पीडीपीचे नेते मुझफ्फर बेग यांनी दिली.

अमेरिकेत काश्मिरी हिंदूंची व्यथा दर्शवणारे प्रदर्शन

अमेरिकेत काश्मिरी हिंदूंची व्यथा दर्शवणारे प्रदर्शन
हिंदूंनो, काश्मिरी हिंदूंच्या व्यथा सातासमुद्रापलीकडे पोहोचवणार्‍या इंडो-अमेरिकन काश्मीर फोरमकडून शिका !
24-06-2008

हॉस्टन, २४ जून (प्रे.ट्र.) - इस्लामी दहशतवादाला बळी पडलेल्या काश्मिरी हिंदूंची व्यथा दर्शवणारे एक प्रदर्शन इंडो-अमेरिकन काश्मीर फोरमने जागतिक निर्वासित दिनाच्या निमित्ताने कान्सास येथे २० जूनपासून आयोजित केले आहे.
स्वत:च्याच भूमीत गेली १८ वर्षे काश्मिरी हिंदू निर्वासित जीवन जगत आहेत. इंडो-अमेरिकन काश्मीर फोरमचे अध्यक्ष श्री. ललित कौल यांनी काश्मिरी हिंदूंना इस्लामी दहशतवादाच्या भीतीपोटी काश्मीर सोडून जाणे कसे भाग पाडण्यात आले, हे स्पष्ट केले. निर्वासितांचे जीवन जगणार्‍या हिंदूंच्या आरोग्यविषयक समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून त्याची इत्थंभूत माहिती श्री. कौल यांनी या वेळी दिली. काश्मिरी हिंदूंवर दहातवाद्यांनी काश्मीरचे खोरे सोडण्यासाठी कशी जबरदस्ती केली, हे श्री. कौल यांनी प्रेक्षकांसमोर मांडले. प्रेक्षकांनी या दहशतवादाच्या विरोधात आवाज उठवावा व निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.